Unobtrusive Measures

Sunday, October 19, 2008

ती: सला विचार रतोयेस?

तो: काही विशेष नाही , जाऊ दे.

ती: सांग ना? कसला विचार करतोयेस?

तो: बरं ऐक, rather कल्पना कर. आपण दोघ असंच चालत चाललोय. सकाळचं कोवळं उन पडलयं. आसपासच्या हवेत थोड़ा गारठा निर्माण झालाय. चालता चालता एक छोटी नदी लागते. नदीच्या बाजुला एक सुंदर तलाव आहे. तलावाच्या काठाशी आपण बसतोतलावाचे पाणी किंचित गरम असते. दोन्ही पाय पाण्यात टाकल्याने पायांना एक प्रकारचे उब मिळतेय. आपण फ़क्त दोघच बेधुंद एकमेकात हरवून बसलोय. हातात हात गुंफ़लेले. तु सहजच माझ्या खांद्यावर डोकं टेकावतेस. आणि...आणि...

ती: आणि काय?

तो: काही नाही, जाऊ देत.

ती: नाही सांग.

तो: नको तु मारशील.

ती: नाही मारणार, सांग ना आणि काय?

तो: आणि बाजुला एक कुत्रा पाय वर करून शुऽऽ करत असतो. आणि त्याचा परिणाम म्हणुन की काय तलावातुन छोटे छोटे मशरूम उगवायाला लागतात. 

ती: शीऽऽऽई. कसला बोरर आहेस तु.  सगळ्या रोमांटिक वातावरणावर पाणी फिरवलेस.

तो: पाणी नाही, मशरूम फिरवले.


आणि अश्या रितीने मराठी भाषेला अजुन एक वाक्प्रचार मिळाला. 'मशरूम फिरवणे ': विरजन घालणे, बट्ट्याबोळ करणे. खरं तर आपल्या डेली कोन्वेर्सशन मधुन आपल्या न कळत अनेक म्हणी किंवा वाक्प्रचार तयार होत असतात. माझा एक मित्र 'चेपणे ' हा शब्द त्याचा मुळ अर्थ सोडुन अनेक वेग-वेगळ्या अर्थांनी वापरतो. 'पुस्तक चेपणे ' म्हणजे वाचणे, 'चेपायला कलटी' म्हणजे जेवायला गेलोय. तसेच 'चावणे ' म्हणजे खुप पकवणे किंवा खुप बोर करणे असेही बरेच लोक वापरतात. झी मराठीवरील सा रे ग म प ह्या गाण्यांच्या कार्यक्रमात अवधुत गुप्तेने एक नविनच शब्द शोधलाय. 'चाबुक गायलास ' म्हणजे खुप छान गायलास. अशी नव-नविन शब्दांची, वाक्प्रचारांची भर झाल्याने कदाचित भाषेचे evolution होत असेल. 

ह्या सगळ्या एकंदर प्रकाराला भाषा प्रौढ होण्यापासुन, भाषेचा विस्तार झाला, तसेच भाषेचा ह्रास झाला असेही म्हटले जाऊ शकते. असेलही कदाचित हा भाषेचा ह्रास, कुणास ठावुक. पण थोड़े मागे वळुन बघितले तर वाटते हयात काही गैर नाहीये. खरं तर ज्ञानेश्वरांनी सामान्य माणसाला कळावे म्हणुन ज्ञानेश्वरी हे गीतेचे मराठीत भाषांतर केले. पण आज आपण बघतो की ही ज्ञानेश्वरी देखील आपल्याला क्लिष्ट वाटुन तिच्याही भाषांतराची आपल्याला गरज भासते. अगदी २० व्या शतकात लिहिलेले गीताहस्यातले मराठीसुद्धा डोक्यावरुन जाते (माझ्यातरी). फार दुरवर कश्याला जायचे अगदी एक घरात राहणारया आईवडिलांना सुद्धा आपल्या मुलांच्या conversation मधले नविन शब्दप्रयोग ऐकून आपण मागास होत चालल्याची जाणीव झाल्यास नवल वाटु नये. भाषेतला असा होणार बदल योग्य वा अयोग्य हा प्रश्न कदाचित गौणच आहे. तसा तो गौण नसता तर भारतात प्रत्येक २०० कि.मी. ला एक वेगळी बोली-भाषा दिसली नसती. नुसते महाराष्ट्रतच बघितले तर मराठीची अनेक variants दिसतात. मराठी dilaects वरून कुठलाही माणुस विदर्भाचा, मराठवाड्याचा कोल्हापुर किंवा नाशिकाचा हे ओळखणे फार काही अवघड जात नाही.

भाषा मुळातच जर self-evolving असेल तर भाषाभिमान तरी योग्य आहे का? काळनुसार किंवा प्रांतानुसार भाषाच जर बदलत असेल तर अभिमान तरी कुठल्या गोष्टीचा करायचा? भाषेतील बदल अपेक्षितच असेल तर त्या बदलला चिकाटीने विरोध करणे तरी योग्य आहे का? भाषेवरुन राजकीय issue निर्माण करणारया नेत्यांना ह्या भाषेच्या 'वाट लागण्याची ' कल्पना आहे का?

ता.क.- मलाही माझ्या मराठीचा जाज्वल्य अभिमान आहे. का? शोधतोय :)

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home